गावाविषयी माहिती

पिंजाळ नदी नदीच्या संगमावर आखाडा  हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा  तालुक्यातील एक गाव प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.आखाडा गावात विठ्ठल रखुमाई ,गावदेवी मंदिर , वाघोबा  मंदिर हि धार्मिक केंद्रबिंदू आहेत. तसेच गावालगत  पांडव कालीन भोपतगड(बबदगड) हा किल्ला  आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे   आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे ४  ,समाज मंदिर ४  अशी शैक्षणिक  सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत आखाडा   येथील  ग्रामस्थ पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच  गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून मोगरा हे  ही प्रमुख पिके घेतली जातात.

आखाडा    ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत  गावात सार्वजनिक आणि वैक्तिक शौचालये बांधली आहेत.जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ७ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

आखाडा  गाव आज वाडा  तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

आखाडा   हे गाव वाडा  तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ४२ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ २०३.८१ आर  हे असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ४१२  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १४४६ आहे. त्यामध्ये ८२१ पुरुष व ६२५  महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने चारही बाजूला डोंगर असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत पिंजाळ  नदी असून  ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्ण कटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ४२°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात २५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ८० ते ९० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

आखाडा ग्रामपंचायत मध्ये  भात,वरई  नागली  शेती प्रामुख्याने केली जाते.

लोकजीवन

आखाडा ..गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय भात शेती व हंगामी भाजीपाला पिके काही प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह शेळीपालन काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

आखाडा..च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

घटक संख्या
लोकसंख्या १४४६
पुरुष ८२१
स्त्री ६२५  
एकूण १४४६

संस्कृती व परंपरा

आखाडा गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,पोळा यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे आखाडा गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत विठ्ठल रखमाई मंदिर ,गावदेवी मंदिर ,चीमादेवी मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

जवळची गावे

आखाडा .गावच्या पूर्वेला केवनाळे गावं ,पश्चिमेला उज्जैनी ,दक्षिणेला पाळसराई डोंगर रांगा आहेत, तसेच उत्तरेला झाप  गाव आहे. तसेच गावाशेजारी परळी मांगरूळ ,हि गावेसुधा आहेत ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.